Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यपालांची रायगड किल्ल्याला भेट

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांनी देशाची वाटचाल सुरू आहे, असं मत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी व्यक्त केलं.

राज्यपालांनी काल रायगड किल्ल्याला भेट देऊन शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. तसंच, राजमाता जिजाऊंच्या समाधीचं दर्शन घेतलं. शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शानं पुनित झालेल्या रायगड किल्ल्याला भेट देऊन नवी उर्जा मिळाली, असही यावेळी बोलताना राज्यपालांनी सांगितलं.

रायगड किल्ल्यावर सुरू असलेल्या विकास कामांबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.

Exit mobile version