Site icon साप्ताहिक एकच ध्येय

वर्षभरात नियंत्रण रेषेवर दोन हजार ३३५ वेळा युद्धबंदीचं उल्लंघन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : ३० मे २०१९ ते २० जानेवारी २०२० या काळात जम्मूतल्या नियंत्रण रेषेवर युद्धबंदीचं उल्लंघन दोन हजार ३३५ वेळा झाल्याची माहिती संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी दिली आहे. ते काल राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात बोलत होते.

२०१९ मधे सियाचिनसह वेगवेगळ्या डोंगराळ भागामधे झालेल्या हिमवृष्टी आणि भूस्खलनामुळे लष्कराचे सतरा जवान मृत्युमुखी पडले. जम्मूतल्या भारत-पाकिस्तान आंतरराष्ट्रीय सीमेवरुन १७७ वेळा गोळीबार झाला, इत्यादी माहिती त्यांनी दिली.

Exit mobile version