Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाची माघार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : फिलिपिन्समध्ये मनिला इथे येत्या ११ ते १६ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या आशियाई बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेतून भारताच्या महिला संघाने माघार घेतली आहे.

कोरोना विषाणू संसर्गाच्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून महिला संघ या स्पर्धेत उतरणार नसल्याचे भारतीय बॅडमिंटन संघटनेनं स्पष्ट केलं आहे.

पुरुषांचा संघ मात्र या स्पर्धेत सहभागी होणार असून आज रात्री ते मनिला साठी रवाना होतील.

Exit mobile version