Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाविद्यालयांमध्ये १९ तारखेपासून राष्ट्रगीत गायन सक्तीचं

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या सर्व महाविद्यालयांमध्ये राष्ट्रगीत गायन सक्तीचं होणार आहे. येत्या १९ फेब्रुवारीपासून हा निर्णय अंमलात येईल, असं राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं.

१९ फेब्रुवारीपासून महाविद्यालयांनी राष्ट्रगीत गाण्याची तयारी सुरू करावी, अशी अधिसूचना राज्यसरकार काढणार आहे, असंही सामंत यांनी सांगितलं. या निर्णयानुसार, महाविद्यालयांचे कामकाज राष्ट्रगीत गायनानंतर सुरू होईल.

Exit mobile version