नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला क्रिकेटच्या टी-ट्वेंटी विश्वचषक स्पर्धेत आज भारतीय महिला संघानं बांगलादेशावर 18 धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना भारतीय महिलांनी वीस षटकात सहा बाद 142 धावा केल्या, या धावसंख्येचा पाठलाग करताना बांगलादेशाचा संघ आठ गडी गमावून 124 धावापर्यंतच मजल मारु शकला.
भारतीय महिला संघाचा बांगलादेशावर 18 धावांनी विजय
