Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आरे वृक्षतोड प्रकरणात पर्यावरण प्रेमींवर झालेले गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : आरे वृक्षतोड प्रकरणात स्थानिक नागरिक, आदीवासी आणि पर्यावरण प्रेमींवर झालेले  गुन्हे ३० दिवसांच्या आत मागे घेऊ, असं आश्वासन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिलं आहे. आरे प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या व्यक्तींनी आज सतेज पाटील यांची भेट घेतली.

मेट्रो कारशेडसाठी हजारो झाडे तोडण्याच्या पार्श्वभूमीवर १ हजार झाडं तोडण्यात आली होती. यावेळी  स्थानिक नागरिक, आदीवासी आणि पर्यावरण प्रेमींनी या वृक्षतोडीला विरोध केल्यानं त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते.

Exit mobile version