Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत खोटी माहिती पसरवून विरोधी पक्ष जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करत असल्याची अमित शाह यांची टीका

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल खोटी माहिती पसरवून जनतेच्या मनात गोंधळ निर्माण करण्यासाठी विरोधी पक्ष जबाबदार असल्याचा आरोप केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आज केला.

ओदिशात भुवनेश्वर इथं आज झालेल्या एका सभेत ते बोलत होते. हा कायदा नागरिकत्व देण्यासाठी असून, कोणाचंही नागरिकत्व हिरावून घेण्यासाठी नाही, त्यामुळे कोणत्याही मुसलमान अथवा इतर अल्पसंख्याक समुदायाच्या नागरिकत्वाला धोका नाही, असंही ते पुढे म्हणाले.

ओदिशाच्या विकासासाठी भारतीय जनता पक्ष वचनबद्ध असून, ओदिशाच्या जनतेनं पक्षाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन त्यांनी केलं.

Exit mobile version