Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज – उद्धव ठाकरे

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज विधानपरिषदेत केलं. येत्या महिला दिनाच्या निमित्तानं, विधानपरिषदेत आज ‘महिलांच्या शाश्वत विकासाची उद्दिष्ट आणि महिला सक्षमीकरण’ यासंदर्भातला ठराव उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी  विधानपरिषदेत मांडला.

या प्रस्तावावरील चर्चेला ते उत्तर देत होते.राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू करण्याची घोषणा  आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज विधानपरिषदेत केली. पहिल्या टप्प्यात उपजिल्हा रुग्णालयात आणि पुढच्या वर्षी राज्यातल्या ३५६ तालुक्यात डायलिसीस केंद्र सुरू केली जातील अशी माहिती त्यांनी दिली. टाटा कर्करोग रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णांच्या आणि नातेवाईकांच्या सोयीसाठी महिनाभरात धर्मशाळा बांधली जाईल, असंही टोपे यांनी यावेळी सांगितलं.

मुंबईत जलपर्यटन वाढवण्याच्या दृष्टीनं, नद्यांच्या पुनरुज्जीवनाचं काम गतिमानतेनं सुरु आहे, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना  विधानपरिषदेत सांगितलं. विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईतील नद्यांच्या पुनरुज्जीवनासंदर्भात विचारलेल्या प्रश्नाला आदित्य ठाकरे उत्तर देत होते.

महाराष्ट्राला अंमली पदार्थांचा विळखा पडू देणार नाही, अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आज विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली. अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री रोखण्यासाठी राज्य सरकार कठोर पावलं उचलत आहे असं त्यांनी सांगितलं.
Exit mobile version