Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : जम्मू-काश्मीर प्रशासनानं समाज माध्यमांवर असलेली बंदी उठवली आहे. कलम ३७० रद्द केल्यानंतर सात महिन्यांनी ही बंदी उठवली आहे.

२-जी मोबाईल सेवा लोकांना वापरता येईल. या आधी काही निवडक संकेत स्थळांना वापरण्याची मुभा होती.

जम्मू-काश्मीर मधली परिस्थिती सामान्य होत असल्याचं हे निदर्शक आहे, असं एका अधिकाऱ्यानं सांगितलं.

Exit mobile version