Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी- मुख्यमंत्री

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रातल्या लोकांसाठी उत्तरप्रदेशात महाराष्ट्र भवनाची निर्मिती करावी अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना केली आहे.

श्रीरामाचं दर्शन घेण्यासाठी आज अयोध्येत दाखल झाल्यानंतर, उद्धव ठाकरे बातमीदारांशी बोलत होते. राममंदिरासाठी शिवसेनेतर्फे १ कोटी रुपयांच्या निधीची घोषणाही, त्यांनी यावेळी केली.

कोरोनामुळे इच्छा असूनही शरयू नदीची आरती करता येत नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खंत व्यक्त केली. आपण भाजपापासून वेगळे झालो आहोत, हिंदुत्वा पासून नाही, असंही उद्धव यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Exit mobile version