Site icon साप्ताहिक एकच ध्येय

नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांचं समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांनी समाज निर्माण करण्यात तसंच राष्ट्राला प्रेरित करण्यात मोठं योगदान दिलं आहे, असं प्रधानमंत्री मोदी म्हणाले.

त्यांनी काल नवी दिल्लीत नारी शक्ती पुरस्कार विजेत्यांशी संवाद साधला.

महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाशिवाय देशात उगड्यावरील शौचापासून मुक्त होण्याचं उद्धिष्ट गाठता आलं नसतं असं प्रधानमंत्री म्हणाले.

कुपोषणाची समस्या देखिल महिलांच्या सहभागानं सोडवता येऊ शकते.

राष्ट्रपती रामनाथ कोंविद यांनी काल आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त 15 कतृत्ववानं महिलांचा नारी शक्ती पुरस्कार देऊन सन्मान केला.

Exit mobile version