Site icon साप्ताहिक एकच ध्येय

इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध – एस जयशंकर

Hindan: Indian nationals after they were brought to India by Indian Air Force's (IAF) C-17 Globemaster III aircraft from coronavirus-hit Iran at Hindan airport, Tuesday, March 10, 2020. Fifty-eight Indians were airlifted in the military transport aircraft. (PTI Photo/Ravi Choudhary)(PTI10-03-2020_000055B)

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : इराणमध्ये अडकलेल्या सर्व भारतीयांना त्यांची योग्यप्रकारे तपासणी केल्यानंतर सुरक्षितपणे भारतात आणण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असं परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी आज सांगितलं. यांसंदर्भात राज्यसभेत आज त्यांनी निवेदन केलं.

उच्चाधिकार मंत्रिगट आणि केंद्रिय मंत्रिमंडळ सचिव यांच्याकडून कोरोना विषाणु संसर्गाच्या प्रसारावर  सातत्यानं देखरेख केली जात आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हेही सर्व घडामोडींवर आणि कोविड-१९ चा प्रसार रोखण्यासाठी सरकार करत असलेल्या उपाययोजनांवर नजर ठेवून आहेत, असं जयशंकर म्हणाले.

Exit mobile version