Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातून निवडून द्यायच्या राज्यसभेच्या सातही जागा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग मोकळा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यातल्या राज्यसभेच्या सात जागांसाठी सातच अर्ज आल्याने सर्व उमेदवारांची बिनविरोध निवड होईल असं स्पष्ट झालं आहे. राज्यातून राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शरद पवार, फौजिया खान, काँग्रेसतर्फे राजीव सातव, भाजपतर्फे उदयनराजे भोसले, रामदास आठवले आणि भागवत कराड आणि शिवसेनेतर्फे प्रियंका चतुर्वेदीयांनी उमेदवारी देण्यात आली आहे.

आज अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवसाअखेर या सात जणांव्यतिरीक्त इतर कुणीही अर्ज दाखल केला नाही. त्यामुळे या सात जणांची निवड बिनविरोध होईल, असं स्पष्ट झालंय.

निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार २६ मार्च रोजी राज्यसभेसाठी मतदान होऊन निकाल जाहीर होणार होते. त्यामुळे त्याच दिवशी या उमेदवारांच्या बिनविरोध निवडीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version