Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोनामुळे निर्माण झालेल्या स्थितीवर सरकारचं पूर्ण लक्ष आहे, लोकांनी मोठ्या संख्येनं एकत्र येऊ नये, प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच आवाहन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणुमुळे देशवासियांनी घाबरु नये तसंच या विषाणुची लागण होऊ नये म्हणून प्रत्येकानं योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटर संदेशात केलं आहे. केंद्रीय मंत्री परदेश यात्रा करणार नाहीत, आणि नागरिकांनी ही गरज नसल्यास विदेशवारी करु नये, असेही ते म्हणाले.

मोठ्या संख्येनं लोकांनी एकत्र येऊ नये जेणे करुन या विषाणूचा फैलाव रोखला जाईल. या विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून सर्वच मंत्रालयांमार्फत योग्य ती उपाय योजना केली आहे, असंही त्यांनी सांगितले.

Exit mobile version