Site icon साप्ताहिक एकच ध्येय

सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जाणार

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : मुंबई विद्यापिठासंबंधी सर्व महाविद्यालये आणि संस्थांच्या ठेवी राष्ट्रीयकृत बँकांमध्ये वळवल्या जातील, असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्रालयानं आज जाहीर केलं.मुंबई विद्यापीठाच्या १४० कोटी रुपयांच्या ठेवी येस बँकेत आहेत.

बँकेवरचं सध्याचं आर्थिक संकट लक्षात घेता शक्य तितक्या लवकर या ठेवी सुरक्षित ठिकाणी वळवाव्यात अशी मागणी, शिवसेनेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी आज विधानपरिषदेत केली, त्यावर उच्चतंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली.

Exit mobile version