Site icon साप्ताहिक एकच ध्येय

येत्या रविवारी जवळपास सर्व रेल्वे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे बोर्डाचा निर्णय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : येत्या रविवारी अर्थात जनता कर्फ्युच्या दिवशी रेल्वे सेवांची गरज कमी भासणार असल्यामुळे जवळपास सर्व रेल्वे गाड्या रद्दकरण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे.

उद्या मध्यरात्री पासून रविवारी रात्रीदहापर्यंत धावणाऱ्या जवळपास सर्व पॅसेंजर, एक्स्प्रेस, इंटरसिटी आणि दीर्घपल्ल्याच्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. यामुळे सुमारे ३५०० रेल्वे गाड्या रद्द झाल्या आहेत.

याशिवाय मुंबईत कमीत कमी लोकल चालविल्या जाणार आहेत. लोकलच्या किती गाड्या चालवायचा याचा निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित रेल्वे मंडळाला देण्यात आले आहेत.

Exit mobile version