Site icon साप्ताहिक एकच ध्येय

जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर मध्यरात्री १२ ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वे सेवा बंद

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात उद्या पाळण्यात येणाऱ्या जनता संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर आज मध्यरात्री १२ पासून ते उद्या रात्री १० वाजेपर्यंत रेल्वेची लांब पल्ल्याची कोणतीही प्रवासी गाडी सुटणार नाही.

उद्या सकाळी सात वाजेच्या आधीपासून धावत असलेल्या प्रवासी रेल्वेगाड्या मात्र प्रवास पूर्ण करतील. आधीपासून धावत असलेल्या मेल आणि एक्सप्रेस रेल्वेगाड्या उद्या पहाटे चार वाजता जिथे असतील तिथेच थांबवण्यात येणार असल्याचं रेल्वे मंडळाच्या आदेशात म्हटलं आहे.

उपनगरी रेल्वे गाड्यां अत्यावश्यक तेवढ्याच चालवल्या जातील. मुंबईत मोनोरेल बंद राहील.

Exit mobile version