Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात रक्तदानाचे आवाहन

मुंबई (वृत्तसंस्था) : कोरोनाच्या प्रादुर्भानं आरोग्य व्यवस्थेवर आलेल्या ताणामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली आहे. या पार्श्वभूमीवर रक्तपेढ्यांनी सुरक्षित पद्धतीनं, मर्यादित स्वरुपाच्या आणि सामाजिक स्तरावर व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर राखलं जाईल अशा पद्धतीनं रक्तदान शिबीरांचं आयोजन करावं असं आवाहन त्यांनी केलं.
नागरिकांनीही घाबरुन न जाता मात्र सुरक्षेची खबरदारी घेत रक्तसंकलनात योगदान द्यावं असंही आवाहन टोपे यांनी केलं आहे.
Exit mobile version