Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राहुल गांधींकडून केंद्र सरकारचे कौतुक

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्यांसाठी केंद्र सरकारनं घोषित केलेलं आर्थिक पॅकेज म्हणजे  योग्य वेळी, योग्य दिशेनं उचललेलं पाऊल आहे, अश्या शब्दात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर संदेशात सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे.

या कठीण प्रसंगाचा सामना करणाऱ्या  शेतकरी, कामगार, रोजंदारी करणारे कामगार, महिला आणि वरिष्ठ नागरिकांच्या पाठीशी संपूर्ण देशानं उभं रहायला हवं, असंही त्यांनी या संदेशात म्हटलं आहे.

Exit mobile version