Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेत केंद्रीय मंत्र्यांची कार्यालयांमधून कामकाजाला सुरुवात

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : कोविड -१ ९ मुळे लॉकडाऊन दरम्यान कडक खबरदारी घेत कित्येक केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या कार्यालयांमधून आजपासून पुन्हा कामाला सुरुवात केली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण, पर्यटनमंत्री प्रह्लादसिंग पटेल, क्रीडामंत्री किरेन रिजिजू, आदिवासी कार्यमंत्री अर्जुन मुंडा असे अनेक मंत्री हे आज कामावर रुजू झाले.

सर्व मंत्री आणि अधिकारी सुरक्षित सामाजिक अंतर ठेऊन काम करतायेत. टाळेबंदीचे अर्थव्यवस्थेवर होणारे विपरीत परिणाम कमी करण्यासाठी सर्व मंत्रालये काम सुरु करत आहेत,असं अधिकाऱ्यांनी सांगितल्याचं वृत्त आहे.

Exit mobile version