Site icon साप्ताहिक एकच ध्येय

स्थलांतरित मजूरांना गावी पाठवण्यासाठी चर्चा – अनिल देशमुख

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात अडकलेल्या स्थलांतरित मजूरांना नियोजनबद्ध पद्धतीनं त्यांच्या गावी पाठवण्यासाठी राज्य सरकार इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहे, असं गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितलं.

ते आज नाशिक इथं बातमीदारांशी बोलत होते. ही चर्चा पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे या मजुरांना परत पाठवण्याबाबतचा निर्णय जाहीर करतील, असं त्यांनी सांगितलं.

Exit mobile version