Site icon साप्ताहिक एकच ध्येय

श्रमिक रेल्वेगाडीतून बाराशे कामगार मध्य प्रदेशात रवाना

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात स्थलांतर केलेल्या सुमारे बाराशे कामगारांना मध्य रेल्वेने पनवेल इथून विशेष श्रमिक रेल्वेगाडीतून मध्य प्रदेशातल्या रेवाकडे रवाना केले आहे. काल मध्यरात्रीनंतर ही रेल्वे सोडली असून चोवीस डब्यांच्या या गाडीतून, राज्य सरकारकडे नोंदणी झालेल्या नियुक्त कामगारांना पाठवले आहे.

मध्य रेल्वेने काल रात्री कल्याणहूनही दोन विशेष श्रमिक रेल्वेगाड्या सोडल्या आहेत. एक गाडी बिहारमधल्या दरभंगाकडे बाराशे कामगारांना घेऊन रवाना झाली आहे. दुसरी गाडी रात्री अकरा वाजता सुमारे साडे नऊशे स्थलांतरित कामगारांना घेऊन आंध्र प्रदेशात गुंटकलकडे रवाना झाल्याची माहितीही मध्य रेल्वेने दिली आहे.

Exit mobile version