Site icon साप्ताहिक एकच ध्येय

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडून आत्मनिर्भर भारत अभियान आणि अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषाणा

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आत्मनिर्भर भारत हे नवं अभियान आणि या अभियानासाठी सुमारे २० लाख कोटी रुपयांच्या आर्थिक योजनेची घोषणा केली. कोरोनाच्या प्रादुर्भावाचा हा काळ भारतासाठी एक मोठी संधी घेऊन आला असून, भारतानं प्रत्येक बाबतीत स्वावलंबी होण्याची गरज असल्याचं त्यांनी आज देशवाशीयांशी संवाद साधताना व्यक्त केली. आत्मनिर्भर भारत अभियानासाठीच्या आर्थिक योजनेचा तपशील केंद्रीय निर्मला सीतारामण लवकरच जाहीर करतील असं त्यांनी सांगितलं.

विकासाला चालना देणारी अर्थव्यवस्था, आधुनिक भारताची ओळख होईल अशा प्रकारची पायाभूत व्यवस्था, २१ व्या शतकातली स्वप्न प्रत्यक्षात आणू शकणारी तंत्रज्ञानाधारी व्यवस्था, आपली लोकसंख्या आणि मागणी हे या आत्मनिर्भरता अभियानाचे मुख्य आधारस्तंभ असणार आहेत असं ते म्हणाले.

देशाच्या १३० कोटी नागरिकांनी देशाला आत्मनिर्भर करण्याचादृढ संकल्प करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.

ही आर्थिक योजना सुक्ष्म, लघु, मध्यम, कुटीर आणि गृह उद्योगासह देशभरातल्या मजूर आणि शेतकऱ्यांसाठी, प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या मध्यमवर्गीयांसाठी, भारताची आर्थिक विकासात योगदान देणाऱ्या उद्योग आणि समाजातल्या प्रत्येक घटकासाठी असेल असं त्यांनी सांगितलं.

दरम्यान कोरोनापासून बचावासाठी पुन्हा एकादा चौथ्यांदा संचारबंदी लागू करावी अशी सूचना अनेक राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी केली आहे. त्यानुसार चौथा लॉकडाऊन सुरु केला जाईल, तो थोडा वेगळा असेल, त्याबाबतची माहितीही १८ मे पूर्वी देऊ असं त्यांनी सांगितलं. कोरोनामुळे

जगभरात मृत्युमुखी पडलेल्या सर्व नागरिकांप्रती त्यांनी संवेदना व्यक्त केली. संपूर्ण जग या व्हायरसपासून बचावासाठी एकाप्रकारचं युद्ध लढत आहे. मात्र मानवजातीनं या संकटापुढे हार मानलेली नाही. आपल्याला जीवही वाचावयचाय आणि पुढेही जायचं आहे. असं ते म्हणाले.

Exit mobile version