Site icon साप्ताहिक एकच ध्येय

५० हजार ऊसतोड कामगारांची आरोग्य तपासणी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : बीड जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे ५० हजार ऊसतोड कामगार परत आले असून या सर्व कामगारांची आरोग्य तपासणी झाली आहे. या कामगारांना सुरुवातीला संस्थात्मक आणि नंतर त्यांच्याच घरी विलगीकरणात ठेवलं आहे.

जिल्हा परिषदेनं या कामगारांच्या कुटुंबियांना दोन महिन्यांच्या किराणा सामानासह इतर आवश्यक वस्तू पुरवल्या असल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.

Exit mobile version