Site icon साप्ताहिक एकच ध्येय

चक्रीवादळामुळं राज्यात एका व्यक्तीचा मृत्यू, जखमी झालेल्या ५ जणांवर उपचार सुरू

मुंबई (वृत्तसंस्था) : निसर्ग चक्रीवादळामुळं अलिबाग तालुक्यात उमटे गावात एका व्यक्तीचा मृत्यू झाला. उमटे गावात वीजेची डीपी अंगावर पडून हा मृत्यू झाल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. तर आतापर्यंत एकूण ५ जण जखमी झाले आहेत.

वादळामुळं अलिबाग नजिक रामराज येथे विजेची डीपी पडल्याने एक व्यक्ती जखमी झाला असून त्याच्यावर उपचार करण्यात येत आहेत, अशी माहिती आमच्या वार्ताहरानं दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात यामुळं 4 जण जखमी झाले आहेत असं पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितलं आहे.

निसर्ग चक्रीवादळामुळं नुकसान झालेल्यांचे पंचनामे सुरू झाले आहेत. नुकसान झालेल्यांना दोन दिवस पंचनामे पूर्ण करून पैसे देण्याचे निर्देश उदय सामंत यांनी दिले आहे.

Exit mobile version