Site icon साप्ताहिक एकच ध्येय

उद्यापासून बेस्टच्या बस गाड्यांमधून सुरक्षित अंतर राखत प्रवास

मुंबई (वृत्तसंस्था) : बेस्ट या मुंबईतल्या सार्वजनिक बस वाहतूक उपक्रमानं उद्यापासून बेस्टच्या बस गाड्यांमधून, सुरक्षित अंतर राखत प्रवास करू देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार बस गाड्यांमध्ये डाव्या आणि उजव्या दोन्ही रांगांमध्ये, दोन जणांकरता असणाऱ्या प्रत्येक आसनावर, एकाच प्रवाशाला बसायची, तसच उभ्यानं, केवळ पाच प्रवाशांना प्रवास करायची अनुमती असेल. या अनुषंगानं सर्व प्रवाशांनी सहकार्य करावं असं आवाहन, बेस्ट उपक्रमानं केलं आहे.

Exit mobile version