Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात चुकीचे निर्णयामुळे कोरोना बधितांची संख्या वाढत असल्याचा भाजप नेत्यांचा आरोप

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य सरकारचे चुकीचे निर्णय आणि अयोग्य नियोजन यामुळे राज्यात कोरोना बधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचा आरोप माजी मंत्री आणि भाजपाचे नेते गिरीश महाजन यांनी आज नाशिकमध्ये केला. अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत मात्र राज्य शासन कोरोना बाधितांच्या संख्येची लपवाछपवी करीत आहे असं ते म्हणाले.

कोरोना बाधितांची संख्या लपवण्यासाठी राज्य सरकार जाणीवपूर्वक खाजगी प्रयोग शाळांना संशयित रुग्णांची चाचणी घेऊ देत नाही असा आरोपही महाजन यांनी केला.

Exit mobile version