Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी -केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे, असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद इथे जनसंवाद यात्रेत सांगितलं.

भारत कधीही आपल्या शेजा-यांची जमीन गिळंकृत करणार नाही, असं ते म्हणाले. कोविड-१९ वरची लस लवकरच तयार होईल, आणि या संकटाचं निराकरण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version