Site icon साप्ताहिक एकच ध्येय

आतापर्यंत देशातले सुमारे अडीच लाख रुग्ण कोरोनामुक्त

नवी दिल्ली : देशभरात काल, १० हजार ९९४ रुग्ण कोरोनामुक्त झाल्यानं त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं. यामुळे देशात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण आता ५६ पूर्णांक ३८ टक्क्यावर पोचलं आहे.

देशभरात आत्तापर्यंत २ लाख ४८ हजार १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, तर सध्या १ लाख ७८ हजार १४ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं ही माहिती दिली. देशभरात काल १४ हजार ९३३ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाल्यानं, देशातल्या कोरोनाबाधितांची एकूण संख्या ४ लाख ४० हजार २१५ वर पोचली आहे.

काल ३१२ जणांचा मृत्यू झाल्यानं, देशात कोरोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या १४ हजार ११ झाली आहे.

Exit mobile version