Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे १०वी आणि १२वी चे निकाल येत्या १५ जुलैला

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांच्या वर्षभरातल्या कामगिरीचं मूल्यमापन करत असून, येत्या १५ जुलैला निकाल जाहीर करणार आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत मंडळाचे परीक्षा नियंत्रक डॉक्टर सनयम भारद्वाज यांनी ही माहिती दिली.

प्रत्येक विद्यार्थ्याच्या कामगिरीचं मूल्यमापन काळजीपूर्वक केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दहावी, बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय मंडळानं नुकताच घेतला.

Exit mobile version