Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : राज्यात आतापर्यंत ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. या काळात ९३ पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यु झाला, त्यात ७ अधिकाऱ्यांचाही समावेश आहे.

कोरोनाबाधित आढळलेल्या ८ हजार २०० पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ६ हजार ३१४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, २१४ अधिकाऱ्यांसह १ हजार ६११ पोलिस कर्मचारी विविध रुग्णालयांमध्ये उपचार घेत आहेत. मृत्यु पावलेल्या ९३ पोलिस कर्मचाऱ्यांपैकी ५२ जण मुंबईतले आहेत.

टाळेबंदी घोषित झाल्यापासून आतापर्यंत २ लाख ७ हजार ५४३ गुन्ह्यांची नोंद झाली असून पोलिसांनी ३१ हजार ६७१ जणांना अटक केली आहे. टाळेबंदी नियमाचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत १६ कोटी ८७ लाख रूपयाचा दंड वसूल केला आहे.

Exit mobile version