Site icon साप्ताहिक एकच ध्येय

अतिवृष्टीमुळे मुंबई शहर-उपनगर जिल्ह्यात आज शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

मुंबई : मुंबईत सातत्याने होत असलेल्या मुसळधार पावसामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोनातून मुंबई शहरसह मुंबई उपनगर जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

अतिवृष्टी होत असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी मुख्याध्यापक, प्राचार्यांनी आज सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद ठेवावीत. तसेच जे विद्यार्थी शाळेत आलेले असतील, त्यांना सुखरूप पालकांच्या हाती देऊनच शाळा सोडावी. नागरिकांनी आवश्यक असेल तरच बाहेर पडावे, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे आणि मुंबई उपनगर जिल्हाधिकारी मिलिंद बोरीकर यांनी केले आहे.

Exit mobile version