Site icon साप्ताहिक एकच ध्येय

ब्रह्मनाळची बोट दुर्घटना दु:खद – राज्यपाल

मुंबई : सांगली जिल्ह्यातील पलूस तालुक्यातील ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेबद्दल राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने थैमान घातले असताना ब्रह्मनाळ गावात पूरग्रस्तांना घेऊन जाणारी बोट उलटून झालेल्या दुर्घटनेत अनेक निरपराध लोकांना प्राण गमवावे लागले, हे समजून अतिशय वाईट वाटले. सांगलीसह सातारा व कोल्हापूर येथे पूरपरिस्थितीमुळे आणखी काही लोकांना प्राण गमवावे लागले हे दु:खद आहे. सर्व मृत व्यक्तींच्या आप्तेष्टांना मी आपल्या शोकसंवेदना कळवतो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

Exit mobile version