Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोयनेतून ६९०७५ तर राधानगरीतून ७३५६ क्युसेक विसर्ग

कोल्हापूर : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दोन दरवाजे खुले  असून धरणाचे मुख्य 3 दरवाजे उचलले आहेत. त्यामधून 3100 क्युसेक विसर्ग असा एकूण 7356 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे. कोयना धरणामधून सकाळी 7 वाजता 69075क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.

पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 52 फूट 11  इंच असून एकूण 107 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.29  टीएमसी पाणीसाठा आहे. चित्री, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रुई,इचलकरंजी, तेरवाड,शिरोळ व शिंगणापूर. भोगावती नदीवरील- राशिवडे, हळदी,  सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली,ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज,कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे, बाचणी,घुंगुरवाडी, कांचणवाडी व भाटणवाडी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे,तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव,पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी,येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड, बाचणी,क.वाळवे, तुरूंबे व सुळंबी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे,मांडूकली, असळज, सांगशी व काताळी. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली,बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव, चिखली,सुक्याचीवाडी, शेळोली, तांबाळे, पाटगाव, दासेवाडी, अन.फ,वाण्याचीवाडी. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी,खंदाळ, निलजी, हरळे, गजरगाव व दाबीळ. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे,कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपर्णी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड, हल्लारवाडी,कोवाड, दुंडगे, कामेवाडी व ढोलगरवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली. धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे, गवसी,म्हसूर्ली व शेळोशी व चित्री नदीवरील कर्पेवाडी (करोली) असे एकूण 107बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या अलमट्टी धरणात 84.44 टीएमसी तर कोयना धरणात 102.99  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.30 टीएमसी, वारणा 32.19 टीएमसी,दूधगंगा 22.78 टीएमसी, कासारी 2.50टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी2.48 टीएमसी, पाटगाव 3.72टीएमसी, चिकोत्रा 1.41, चित्री 1.88टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी,घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.

बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 52.11 फूट, सुर्वे 50.1फूट, रुई 80.6 फूट, इचलकरंजी 77.6फूट, तेरवाड 82.3 फूट, शिरोळ 77.5फूट, नृसिंहवाडी 77.5 फूट, राजापूर62.4  फूट तर नजीकच्या सांगली 57.5 फूट आणि अंकली  62.4  फूट अशी आहे.

Exit mobile version