Site icon साप्ताहिक एकच ध्येय

भारताचा ऑस्ट्रेलियावर १३ धावांनी विजय

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान कॅनबेरा इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियासमोर ३०३ धावांचं लक्ष्य ठेवलं होत. प्रथम फलंदाजी करत भारतीय संघाच्या हार्दिक पंड्याच्या ९२ आणि रविंद्र जडेजाच्या ६६ धावांच्या बळावर निर्धारित षटकात पाच बाद ३०२ धावा केल्या.

कर्णधार विराट कोहलीनं ६३, शुभमन गीलनं ३३, शिखर धवननं १६, श्रेयस अय्यरनं १९, के एल राहुलनं पाच धावा केल्या. चुरशीच्या संघर्षात भारतानं ऑस्ट्रेलियाचे सर्व गडी बाद केले. आणि १३ धावांनी सामना जिंकला.

Exit mobile version