Site icon साप्ताहिक एकच ध्येय

समृद्धी महामार्गावरचा नागपूर ते शिर्डी हा टप्पा येत्या १ मे पर्यंत पूर्ण होईल असा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विश्वास

मुंबई (वृत्तसंस्था) : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावरचा नागपूर ते शिर्डी हा टप्प्या येत्या १ मे पर्यंत पूर्ण होईल असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज समृद्धी महामार्गाच्या कामाच्या पाहणीसाठी अमरावती आणि औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत.

आज सकाळी त्यांनी अमरावती जिल्ह्यातल्या शिवणी इथं महारामार्गाच्या कामाची पाहणी केली त्यावेळी ते बोलत होते. लॉकडाऊनच्या काळातही या महामार्गाचं काम मंदावलं नाही, काम वेगानं सुरु आहे असं ते म्हणाले. येत्या १ मेला आपण या मार्गावरून नागपूर ते शिर्डी प्रवास करू शकू, तर त्यानंतर २०२२ च्या मे महिन्यात पुढच्या टप्प्याचं मुंबईपर्यंतचं कामही पूर्ण होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Exit mobile version