Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात कोरोनामुक्तीचं प्रमाण वाढून, ९४ पूर्णांक १४ शतांश टक्क्यावर

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३५८ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले, ३ हजार ८८० नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ६५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. राज्यातलं कोरोना रुग्णांच प्रमाण वाढून ९४ पूर्णांक १४ शतांश टक्के झालं आहे. आत्तापर्यंत राज्यभरातले एकूण १७ लाख ७४ हजार २५५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यातली एकूण कोरोनाबाधितांची संख्या १८ लाख ८४ हजार ७७३ झाली आहे. तर एकूण कोरोनाबळींची संख्या ४८ हजार ४९९ झाली आहे.

राज्याच्या कोरोना मृत्यूदरात घट होऊन तो २ पूर्णांक ५७ शतांश टक्क्यावर आला आहे. सध्या राज्यभरात ६० हजार ९०५ कोरोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत.

Exit mobile version