Site icon साप्ताहिक एकच ध्येय

कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी भारतीय सेना सक्षम असल्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : भारतीय सेना प्रत्येक संकटाचा सामना करण्यासाठी सक्षम आहे. देशाच्या सीमेवर होणाऱ्या कोणत्याही आक्रमणाला चोख प्रत्त्युत्तर देण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज असल्याच, संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांनी आज सांगितलं. हैदराबाद मधील दुंडीगल इथल्या भारतीय हवाई दलाच्या अधिकाऱ्यांच्या दीक्षांत संचालनाची पाहणी केल्यानंतर ते आज बोलत होते.

सायबर युद्धासारख्या भविष्यातील आव्हानांचा सामना करण्याकरता संरक्षण दलांनी आधुनिक तंत्रज्ञानानं सुसज्ज राहण्याची गरज आहे असंही राजनाथ सिंह म्हणाले.

Exit mobile version