Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बर्ड फ्ल्यूबाबत मुंबईकर जागरूक

मुंबई (वृत्तसंस्था) : बर्ड फ्ल्यूबाबत मुंबईकर जागरूक झाले आहेत. गेल्या दहा दिवसात कावळे, कबुतरे, चिमण्या मृत पावल्याच्या ५७८ तक्रारी पालिका आपत्कालीन कक्षातील १९१६ या हेल्पलाईनवर आल्या आहेत.

मुंबईतील मालाड, बोरिवली, कांदिवली, दादर, परळ, वडाळा, विक्रोळी, अंधेरी, सायन, माटुंगा, चेंबूर , गिरगाव, कुलाबा आदी भागात बर्ड फ्ल्यूमुळे कावळे, कबुतरं आणि दोन ठिकाणी चिमण्या मृत पावल्या बाबतच्या तक्रारी  हेल्पलाईनवर आल्या आहेत.

Exit mobile version