Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्क्यावर  

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात काल ३ हजार ३०९ रुग्ण या संसर्गातून मुक्त झाले. राज्यात आतापर्यंत १८ लाख ७७ हजार ५८८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातला कोविडमुक्तीचा दर ९४ पूर्णांक ७५ शतांश टक्के झाला आहे.

काल ३ हजार ५७९ नव्या कोविड रुग्णांची नोंद झाली, त्यामुळे राज्यभरातल्या कोविडबाधितांची एकूण संख्या १९ लाख ८१ हजार ६२३ झाली आहे. सध्या राज्यभरात ५२ हजार ५५८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. काल ७० रुग्णांचा या संसर्गानं मृत्यू झाला.

राज्यात या आजारामुळे दगावेल्या रुग्णांची एकूण संख्या ५० हजार २९१ झाली ११ असून, मृत्यूदर २ पूर्णांक ५४ शतांश टक्के झाला आहे.

Exit mobile version