Site icon साप्ताहिक एकच ध्येय

महाराष्ट्रात आजपासून १५ एप्रिलपर्यंत जमावबंदी

A traffic policeman walks in a road on the deserted Durbar Marga in Kathmandu as a lockdown is imposed to contain the coronavirus disease (COVID-19) in Nepal, on March 24, 2020. Photo: Suresh Chaudhary/THT

मुंबई (वृत्तसंस्था) : महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंध १५ एप्रिलपर्यंत पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सुरक्षित अंतर राखणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील.

कार्यालयात यापूर्वी लागू केलेल्या सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाचपेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश २७ मार्च २०२१ पासून लागू करण्यात आलेला असून तो १५ एप्रिलपर्यंत अंमलात असेल. याचं उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

Exit mobile version