Site icon साप्ताहिक एकच ध्येय

देशभरातील जिल्हा कार्यक्रमांमुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांचा सर्वंकश विकास, प्रधानमंत्री यांचं प्रतिपादन

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : देशभरात सुरू असलेल्या महत्त्वाकांक्षी जिल्हा कार्यक्रमामुळे देशातल्या अनेक मागास जिल्ह्यांनी सर्वंकश विकास साधला आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्वीटर संदेशात केलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघानं जारी केलेल्या एका अहवालात या कार्यक्रमाची प्रशंसा करत हा कार्यक्रम एक आदर्श असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. या कार्यक्रमामुळे गेल्या तीन वर्षात मागास तसंच नक्शल प्रभावीत जिल्ह्यांनी अपेक्षीत विकास साधला आहे, असं या अहवालात नमूद केलं आहे.

संयुक्त राष्ट्र संघाचे भारतातले प्रतिनिधी शोको नोडी यांनी हा अहवाल नीती आयोगाचे उपाध्यक्ष डॉक्टर राजीव कुमार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत यांना  काल सुपूर्द केला.या कार्यक्रमाचं योग्य अंमलबजावणी केल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची या अहवालात प्रशंसा देखील केली आहे.

Exit mobile version