Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून ५ कोटींपेक्षा जास्त थाळ्यांचं वाटप

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्य शासनाच्यावतीनं गरीब आणि गरजू घटकांसाठी सुरू असलेल्या शिवभोजन थाळी योजनेचा आजपर्यंत पाच कोटीहून अधिक लोकांनी लाभ घेतला असल्याचं अन्न आणि नागरी पुरवठा मंत्रालयानं कळवलं आहे. राज्यात सध्या १ हजार १६४ शिवभोजन केंद्रांच्या माध्यमातून या थाळ्यांचं वाटप केलं जातं. या केंद्रांमधून १५ एप्रिल ते ७ ऑगस्ट या काळात १ कोटी ७२ लाख ३२ हजार ६९५ मोफत थाळ्यांचं वितरण केलं गेलं. जुलै महिन्यात पुरामुळे बाधित झालेल्या नागरिकांसाठी मोफत ९२ हजार १७ थाळ्याचं वाटप केलं गेलं अशी माहिती मंत्रालयानं दिली आहे.

Exit mobile version