Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण कोरोनामुक्त

मुंबई (वृत्तसंस्था) :राज्यात काल ४ हजार ३६४  रुग्ण बरे होऊन घरी गेले, ३ हजार ७८३ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर ५६ रुग्णांचा मृत्यू झाला.

राज्यात आतापर्यंत एकूण ६५ लाख ७ हजार ९३० जणांना कोरोनाची लागण झाली.‌ त्यापैकी आतापर्यंत ६३ लाख १७ हजार ७० रुग्ण बरे झाले. तर, १ लाख ३८ हजार २७७ रुग्ण दगावले. सध्या राज्यात ४९ हजार ३४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

मुंबईत काल ६०४ रुग्ण बरे झाल्यानं त्यांना रुग्णालयातून सुट्टी दिली. मुंबईत आतापर्यंत ७ लाख १३ हजार २७४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. काल ५१४ नवीन रुग्णांची नोंद झाली. मुंबईत  आतापर्यंत रुग्णांची संख्या  ७ लाख ३६ हजार २८४ झाली असून, मुंबईतला रुग्ण दुपटीचा कालावधी १ हजार २७७ दिवसांवर आलाय. सध्या ४ हजार ६०२ रुग्ण उपचार घेत आहेत. काल कोरोनामुळे ४ रुग्णांचा  मृत्यू झाला असून,  मृतांचा एकूण आकडा १६ हजार ३७ वर पोचला आहे.

नांदेड जिल्ह्यात ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. काल जिल्ह्यात ७ नव्या रुग्णांची नोंद झाली. सध्या ३३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

परभणी जिल्ह्यात ३ रुग्ण बरे होऊन घरी गेले. काल २ नवीन रुग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात ८ रुग्ण उपचार घेत आहेत.

वाशिम जिल्ह्यात काल बरा झालेल्या एका रुग्णाला घरी पाठवलं. काल जिल्ह्यात एकाही नव्या रुग्णाची नोंद नाही. सध्या ९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

Exit mobile version