Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बंदमुळे झालेले नुकसान राज्य सरकारकडून भरुन घेण्याची भाजपची मागणी

मुंबई (वृत्तसंस्था) : आजच्या सरकार-पुरस्कृत बंदची न्यायालयानं दखल घ्यावी आणि झालेल्या नुकसानाची भरपाई राज्य सरकारकडून घ्यावी, अशी मागणी विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडनवीस यांनी केली. महाविकास आघाडीचा आजचा बंद म्हणजे ढोंगीपणाचा कळस असल्याची टीकाही त्यांनी केली. या बंदला लोकांची साथ मिळाली नसून प्रशासनाची मदत घेऊन धाक-दपटशाहीनं काही ठिकाणी बंद यशस्वी झाल्याचं सांगितलं गेलं असं ते म्हणाले.लखीमपूर इथली घटना गंभीर आहे, पण आजचा बंद ही त्या घटनेबाबत संवेदना नसून आपली राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न आहे, असा आरोप त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर केला.

Exit mobile version