Site icon साप्ताहिक एकच ध्येय

राज्यात सुमारे दीड वर्षानंतर आढळले एक हजारापेक्षा कमी रुग्ण

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्यात कोविड १९ च्या नव्यानं आढळणाऱ्या रुग्णांची दैनदिन संख्या सातत्यानं घट होत असून काल ती हजाराच्या खाली आली. त्यामुळे कोरोनामुक्तीचा दरही वाढला आहे. काल राज्यभरात १ हजार ५८६ रुग्ण बरे होऊन घरी गेले, ८८९ नव्या रुग्णांची नोंद झाली, तर १२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यात आतापर्यंत एकूण ६६ लाख ३ हजार ८५० जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी आतापर्यंत ६४ लाख ३७ हजार २५ रुग्ण बरे झाले. तर,  १ लाख ४० हजार २८ रुग्ण दगावले. सध्या राज्यात २३ हजार १८४ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७ पूर्णांक ४७ शतांश टक्के झालं आहे. तर, मृत्यूदर २ पूर्णांक १२ शतांश टक्के आहे.

Exit mobile version