Site icon साप्ताहिक एकच ध्येय

बी. जे. खताळ यांना मुख्यमंत्र्यांकडून श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे माजी मंत्री बी. जे. खताळ यांच्या निधनाने तत्त्वांशी प्रामाणिक राहून राजकारण करणारा  एक ज्येष्ठ नेता आपण गमावला आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.

मुख्यमंत्री आपल्या संदेशात म्हणतात, देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात सहभागी झालेल्या श्री. खताळ यांनी राज्य मंत्रिमंडळात प्रदीर्घ काळ काम करताना विविध विभागाच्या जबाबदाऱ्या यशस्वीरित्या सांभाळल्या होत्या. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत त्यांनी दर्शविलेली तत्त्वनिष्ठा त्यांचे वेगळेपण दाखविणारी होती. नगर जिल्ह्याच्या विकासात त्यांचे मोठे योगदान होते. त्यांच्या निधनाने सहकार क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक विषयांचा अभ्यास असणारे व्यक्तिमत्त्व हरपले आहे.

Exit mobile version