Site icon साप्ताहिक एकच ध्येय

विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : शिक्षण ही निरंतर प्रक्रिया आहे, केवळ विद्यार्थ्यांनीच नाही, तर शिक्षकांनीही सातत्यानं अध्ययन करत अद्ययावत राहायला हवं, असं राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी म्हटलं आहे. मुंबईतल्या ठाकूर विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ‘नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण’ या विषयावरच्या एक दिवसीय चर्चासत्राचं उद्घाटन काल राज्यपालांच्या हस्ते झालं, त्यावेळी ते बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शिक्षकांनी स्वतःचंही मूल्यांकन करायला हवं, त्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता वाढीला लागेल, असं ते म्हणाले.

Exit mobile version