Site icon साप्ताहिक एकच ध्येय

केवळ TCS, IBPS आणि MKCL मार्फतच भरती प्रक्रिया राबवण्याचे राज्य मंत्रीमंडळाचे आदेश

मुंबई (वृत्तसंस्था) : राज्य मंत्रीमंडळानं विविध पदांच्या भरतीसाठी पॅनलवरच कुठल्याही कंपनीची सेवा घेऊ नये, असा निर्णय घेतला आहे. यापुढं पदभरतीच्या सर्व TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. १५ डिसेंबरला झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भातला शासन आदेश काल प्रसिद्ध करण्यात आला आहेत. परीक्षेसाठी पॅनलवर असलेल्या सर्व कंपन्यांच्या पॅनलला मंत्रीमंडळानं स्थगिती दिली आहेत. त्यामुळं राज्य सरकारचे विविध विभाग, महामंडळं आणि इतर सहयोगी संस्थांना TCS, IBPS, MKCL च्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवावी लागेल.

Exit mobile version