Site icon साप्ताहिक एकच ध्येय

पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत – राज्यपाल

मुंबई (वृत्तसंस्था) : पत्रकारांनी प्रशासनाचे दोष दाखवण्यासोबतच चांगली कामे निदर्शनास आणली पाहिजेत असे उद्गार राज्यपाल भगतसिग कोश्यारी यांनी काल राजभवनात आयोजित एका  कार्यक्रमात काढले. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते वरीष्ठ पत्रकारांना पत्रकार भूषण पुरस्कार देण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी एकमतचे संपादक मंगेश देशपांडे डोंग्रजकर यांना दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्कार तर अजित मांडके, राहूल क्षीरसागर आणि उमेश तारे यांना पत्रकार भूषण पुरस्कार देण्यात आला. भगवानराव देशमुख यांना जीवनगौरव पुरस्कार देण्यात आला.

Exit mobile version